Skip to main content

Posts

सगुण रुपाची आवश्यकता.

भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, स्वामी समर्थ, योगानंद, विवेकानंद वगैरे) म्हणतात देव हा एकच आहे. त्याने तुमच्या आमच्या जड जीवांचा उध्दार करण्या साठी अशी रूपे धारण केली कारण साकाराची भक्तीत गोडी लागल्या शिवाय निर्गुणाची भक्तीची गोडी लागणार नाही. त्याच एका देवांनी अनेक रूपे धारण केली आणि आपण अनेक रूपामध्ये अडकलो. चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता ॥ आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक् ‍ त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यस...

देहात्म योग याचा अर्थ

  ॥ श्री ॥ देहात्म योग याचा अर्थ देह अधिक आत्मा या दोघांचा संयोग असलेली स्थिती.जोपर्यंत देहात चैतन्यरूपी आत्मतत्वाचे जे प्रागट्य होत आहे तोपर्यंत देहामध्ये संवेदना आहे.तो अंतरात्माच देहामध्ये राहून अनंत कर्म करून घेतो.पण ज्याक्षणी देहाचा प्राणरूपाने त्याग केला त्याक्षणी गलितगात्र होऊन पडतो.अशा देहामध्ये अंतरात्म्याला जाणण्यासाठी जाणीव, संवेदनशीलता,निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी वाणीला आत्मानुभूतीची जोड हवी.अशा दोन मनाच्या सूक्ष्म अवस्थांच्या आधारे आपल्याला आत्मारामाचे दर्शन प्राप्त करून घेता येवू शकते.आणि ही अंतःकरणाची प्राप्त करण्याचे साधन म्हणजे भगवंताचे नाम.म्हणून समर्थ आत्मारामाच्या दर्शनासाठी,या दोन तत्वांच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगताना म्हणतात..... *सकळ जनामधें नाम ! रामनाम उत्तमोत्तम ! श्रम जाउनी विश्राम ! चंद्रमौळी पावला !! या सृष्टीमध्ये जर आज भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारी संवेदनाशीलता ही आत्मानूभूती कशाने प्राप्त होत असेल तर त्याचे साधे सोपे साधन भगवंताच्या नामाचे आहे.आणि त्या नामामध्ये देखील ज्याचे मन रामनामावर अनुरूक्त झालं,...

आपण कशाला मनुष्य जन्माला आलोय?

  एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता . तो अनेक कामी यायचा. म्हणून त्याने तो ठेवला होता. दरवाजा अपोआप पुढे जाऊ लागला कि त्याला दरवाजाला लावायचा, मुलांना काही खेळायचे असल्यास तोच दगड, घरात कुत्र आल सौभाग्यवतींनी फेकून मारला, अशा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड खितपत घरात पडला होता. वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणी गोल घुमट झाला होता. एक दिवस त्या सद्गृहस्थांच्या घरी एक पाहुणे आले . सहज नजर पडली त्या दगडावर. पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता . सराफ कुळातील असल्याने त्यांनी परीक्षण केले आणी म्हणाले काय हो हे इतका मौलिक रत्न तुम्ही घराच्या दाराला अडसर म्हणून उभ केलंत ? न समजून त्या सद्गृहस्थाने त्यांना प्रश्न उलट प्रश्न केला. ते रत्नपारखी म्हणाले , अहो खरंच हा साधा सुधा दगड नसून अलौकिक रत्न आहे . ते आज त्याची किंमत १० कोट च्या घरात तरी असेल ... झाले !!! दगडाचे जीवनच बदलले . खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणी तिजोरीत ठेवला. मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहत होता ! दृष्टांत संपला आत्ता सिद्...

ज्ञानाची उपयुक्तता दिसली पाहिजे

  प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.' 'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!' मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.' शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.' शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया...

नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर

  ।। श्रीराम समर्थ ।। सदगुरु कृपेने । घेता मुखी नाम । गुरु सत्ता मर्म । ध्यानी येते ।। १ ।।  तेणें अहंकार । होत असे दूर । नाम निरंतर । मुखी घेता ।। २ ।।  साधनेचा नाश । अहंभावनेने । मीठ संयोगाने । दूध जेवीं ।। ३ ।।  बनता साखर । नामस्मरणाने । सदगुरु खात्रीने । भेटतील ।। ४ ।।  नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर. सदगुरू नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो हे त्या नामाचे मर्म आहे. नाम निरंतर घेतल्याने, ' मी नामस्मरण करतो ' अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच उरत नाही. मिठाचा एकच खडा खीर नसवायला पुरेसा होतो, त्याप्रमाणे अभिमान सर्व साधन नसवायला कारणीभूत होतो. तुम्ही अखंड नामस्मरणात राहिल्यास, भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यास सदगुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. . ।। जय जय रघुवीर समर्थ ।। #Dasbodh   #dasbodhnirupan   #ramdasswami   #ramdas   #jaisadguru   #jayjayraghuveersamrth   #jaysadguru

रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा.

🌸🌸 साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान...

माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल

  1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे. पण त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता. 2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो. पण तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो. 3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले दत्तक घेतलेली आहेत. आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका. कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता. तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे. आनंद हा *माझ्याकडे सर...