Skip to main content

Posts

Showing posts with the label Dasbodh Story

आयुष्याची खरी किंमत

  एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडा...

देहात्म योग याचा अर्थ

  ॥ श्री ॥ देहात्म योग याचा अर्थ देह अधिक आत्मा या दोघांचा संयोग असलेली स्थिती.जोपर्यंत देहात चैतन्यरूपी आत्मतत्वाचे जे प्रागट्य होत आहे तोपर्यंत देहामध्ये संवेदना आहे.तो अंतरात्माच देहामध्ये राहून अनंत कर्म करून घेतो.पण ज्याक्षणी देहाचा प्राणरूपाने त्याग केला त्याक्षणी गलितगात्र होऊन पडतो.अशा देहामध्ये अंतरात्म्याला जाणण्यासाठी जाणीव, संवेदनशीलता,निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी वाणीला आत्मानुभूतीची जोड हवी.अशा दोन मनाच्या सूक्ष्म अवस्थांच्या आधारे आपल्याला आत्मारामाचे दर्शन प्राप्त करून घेता येवू शकते.आणि ही अंतःकरणाची प्राप्त करण्याचे साधन म्हणजे भगवंताचे नाम.म्हणून समर्थ आत्मारामाच्या दर्शनासाठी,या दोन तत्वांच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगताना म्हणतात..... *सकळ जनामधें नाम ! रामनाम उत्तमोत्तम ! श्रम जाउनी विश्राम ! चंद्रमौळी पावला !! या सृष्टीमध्ये जर आज भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारी संवेदनाशीलता ही आत्मानूभूती कशाने प्राप्त होत असेल तर त्याचे साधे सोपे साधन भगवंताच्या नामाचे आहे.आणि त्या नामामध्ये देखील ज्याचे मन रामनामावर अनुरूक्त झालं,...

नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर

  ।। श्रीराम समर्थ ।। सदगुरु कृपेने । घेता मुखी नाम । गुरु सत्ता मर्म । ध्यानी येते ।। १ ।।  तेणें अहंकार । होत असे दूर । नाम निरंतर । मुखी घेता ।। २ ।।  साधनेचा नाश । अहंभावनेने । मीठ संयोगाने । दूध जेवीं ।। ३ ।।  बनता साखर । नामस्मरणाने । सदगुरु खात्रीने । भेटतील ।। ४ ।।  नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर. सदगुरू नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो हे त्या नामाचे मर्म आहे. नाम निरंतर घेतल्याने, ' मी नामस्मरण करतो ' अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच उरत नाही. मिठाचा एकच खडा खीर नसवायला पुरेसा होतो, त्याप्रमाणे अभिमान सर्व साधन नसवायला कारणीभूत होतो. तुम्ही अखंड नामस्मरणात राहिल्यास, भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यास सदगुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. . ।। जय जय रघुवीर समर्थ ।। #Dasbodh   #dasbodhnirupan   #ramdasswami   #ramdas   #jaisadguru   #jayjayraghuveersamrth   #jaysadguru