।। श्रीराम समर्थ ।। सदगुरु कृपेने । घेता मुखी नाम । गुरु सत्ता मर्म । ध्यानी येते ।। १ ।।
तेणें अहंकार । होत असे दूर । नाम निरंतर । मुखी घेता ।। २ ।।
साधनेचा नाश । अहंभावनेने । मीठ संयोगाने । दूध जेवीं ।। ३ ।।
बनता साखर । नामस्मरणाने । सदगुरु खात्रीने । भेटतील ।। ४ ।।
नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर. सदगुरू नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो हे त्या नामाचे मर्म आहे. नाम निरंतर घेतल्याने, ' मी नामस्मरण करतो ' अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच उरत नाही. मिठाचा एकच खडा खीर नसवायला पुरेसा होतो, त्याप्रमाणे अभिमान सर्व साधन नसवायला कारणीभूत होतो. तुम्ही अखंड नामस्मरणात राहिल्यास, भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यास सदगुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. . ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
#jaisadguru #jayjayraghuveersamrth #jaysadguru

Comments
Post a Comment