Skip to main content

Posts

महाभारतकालीन राजा सत्यदेव

Recent posts

समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ

  उत्तम बोध. समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ. प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर् ‍ यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल. गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे. मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता. सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला. चार श्वान म्हणजे चार वेद आहेत. सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो. मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय. सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे...

शिष्य समर्थांना म्हणाला

  एक शिष्य समर्थांना म्हणाला, मी उपासनेला बसलो की माझ्या मनात अनेक विचार येतात त्यामुळे माझी उपासना उत्तम होत नाही. याउलट विचारचक्र वाढत जाते तेव्हा यावर उपाय सांगा. समर्थ हसले, समर्थांनी त्या शिष्याला एक काम सांगितले. समर्थ म्हणाले, त्या बाजूच्या छोट्या नदीतून पाणी घेऊन ये. शिष्य पाणी आणायला गेला. त्या नदीच्या किनाऱ्यावर काही बायका कपडे धूत होत्या. भांडी घासत होत्या. त्या नदीतून एक बैलगाडी गेली. त्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालं होतं. तो शिष्य तसाच समर्थजवळ रिकाम्या हाती परतला. आणि समर्थाना म्हणाला, नदीचं पाणी गढूळ झालं आहे. समर्थ हसले, म्हणाले जा थांब थोडा वेळ आणि पाणी घेऊन ये. तसा तो गेला त्याने पाहिलं नदीवर आता कोणीच नाही. पाणी स्वच्छ झालं होतं. गाळ तळाला जाऊन बसला होता. त्या शिष्याने त्या भांड्यात पाणी घेतले आणि समर्थाजवळ आला. समर्थ म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का. समर्थ म्हणाले, थोडा वेळ थांबल्यावर पाणी स्वच्छ झाले व नदीचे पाणी स्वच्छ वाहते आहे. समर्थ म्हणाले, मनाचे ही तसेच आहे, " उपासनेला बसल्यावर असे अनेक गढूळ विचार येतील पण कालांतराने ते निघून ही जातील. पण आपली उ...

अपमान आणि उपकार

  एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,” आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले.” ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,”आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्...

आपणास हे माहित आहे का ?

  तेहतीस कोटी देव कोणते ? उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो . पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे - आप,धृव,सोम,धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास. अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू. असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३

अजी मी देव पाहिला.....🙏😊

  सद्या दहा दिवस देव देवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मीठाया बनवून जरा दमल्यासारखे झाले होते. म्हणून पोळ्यावाल्या बाईला म्हटलं पाहुण्यांनसाठी म्हणून थोडा शेव चिवडा बनवून देतेस का?तीने शिंगाड्याची शेव बनवायला घेतली. कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली व एक बोकणा माझ्या तोंडात भरला.तीने खातांना म्हटले बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत लागते.मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी आली आहे, तीच्या साठी करीन म्हणते.केवढ्याला येत हो काकु हे पीठ ?मी सहजतेने म्हटलं असेल साठ,सत्तर रु.पाव फक्त. त्यावर ती एकदम म्हणाली बापरे,एवढ महाग असत.त्यासरशी माझा घास घशातच अडकला. किती सहजतेने मी फक्त साठ, सत्तर म्हणाली.खरतरं एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आलेली.पण हिची कथा अधिक संघर्षमय होती.मोठी बहीण अकालीच वारली म्हणून तिच्या तीन लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हीचे लग्न लावून दिले. ते कमी की काय म्हणून अजून दोन मुली तीच्या पदरात टाकून आजाराच निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला. कधीही घराचा उंबरठा न ओलांड-लेली पोराबाळांसाठी बाहेर पडली. माहेरी म्हातारी आईशिवाय क...

आयुष्याची खरी किंमत

  एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडा...