उत्तम बोध.
समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ.
प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर्यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल.
गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे.
मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता.
सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला.
चार श्वान म्हणजे चार वेद आहेत.
सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो.
मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय.
सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे परमार्थ जो गुप्तपणे, गाजावाजा न करता करायचा उघड करशील तर देहाकडे अहंकार मीपणा येईल.
आणि संसार व प्रपंच म्हणजे डावा हात जो उघडपणे कर.

Jai sadguru
ReplyDeleteजय सदगुरू
ReplyDeleteJai sadguru
ReplyDelete